शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
3
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
4
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
5
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
6
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
7
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
8
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
9
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
10
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
11
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
12
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
13
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
14
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
15
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
16
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
17
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
18
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
19
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
20
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार

घर आहे, पण महावितरणची वीज नाही! रत्नागिरी  जिल्ह्यातील ५,९५१ घरांमध्ये अजूनही अंधारच, धक्कादायक आकडेवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 10:54 IST

देशाला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे झाली तरीही रत्नागिरी जिल्ह्यातील तब्बल ५,९५१ घरांपर्यंत अजूनही वीज पोहोचलेली नाही. ही घरे विजेअभावी अंधारात चाचपडत आहेत. भारतीय टपाल विभागाकडून जिल्ह्यातील ग्रामीण भागात घरोघरी करण्यात

ठळक मुद्दे भारतीय टपाल विभागाकडून जिल्ह्यातील ग्रामीण भागात घरोघरी करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून हे सत्य समोर

रत्नागिरी : देशाला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे झाली तरीही रत्नागिरी जिल्ह्यातील तब्बल ५,९५१ घरांपर्यंत अजूनही वीज पोहोचलेली नाही. ही घरे विजेअभावी अंधारात चाचपडत आहेत. भारतीय टपाल विभागाकडून जिल्ह्यातील ग्रामीण भागात घरोघरी करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून हे सत्य समोर आले आहे.

केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाला मार्च २०१९पर्यंत प्रत्येक घरापर्यंत वीज पोहोचवायची आहे. त्यामुळे यासाठी वस्तुनिष्ठ अहवाल समोर यावा, या दृष्टीने केंद्रीय ऊर्जामंत्री यांनी भारतीय टपाल विभागाकडे ही जबाबदारी दिली आहे. दळणवळणाचे प्रमुख साधन असलेला आणि संदेशाचे वहन करणारा प्रमुख विभाग म्हणून टपाल विभागाकडे पाहिले जाते. 

ब्रिटीश काळात सुरू झालेल्या या विभागाने अगदी ग्रामीण भागातील जनतेशी एक वेगळे विश्वासाचे आणि सेवेचे नाते जोडले. हे नाते आत्तापर्यंत टिकून आहे. पोस्टाची जिल्ह्यात ५८४ ग्रामीण कार्यालये आहेत. तर ७७ उपकार्यालये आहेत. रत्नागिरी आणि चिपळूण येथे मुख्य कार्यालय (प्रधान डाकघर) आहे. पोस्टमन प्रत्येक गावातील घरात पोहोचला 

आहे. 

ग्रामीण भागातील जनतेशी पोस्टाने जोडलेली नाळ लक्षात घेऊन केंद्रीय ऊर्जा विभागाने अद्याप वीज पोहोचलेली नाही, अशा ठिकाणांचे सर्वेक्षण करण्याची जबाबदारी सोपवली होती. यासाठी पोस्ट विभागाला जेमतेम दीड महिन्यांचा कालावधी देण्यात आला होता. यासाठी १५ नोव्हेंबरपर्यंत हे सर्वेक्षण पूर्ण करावयाचे होते. 

प्रत्येक गावातील सर्वेक्षणाची जबाबदारी त्या भागातील टपाल कार्यालयाकडे देण्यात आली. मात्र, जिल्ह्यातील सर्वच ग्रामीण पोस्ट कार्यालयांकडून जलदगतीने काम झाल्याने हे सर्वेक्षण १४ नोव्हेंबरलाच पूर्ण झाले.

जिल्ह्यातील एकूण १,५३१ गावांपैकी १५२६ गावांमधील ३ लाख ७९ हजार १४२ घरांमध्ये सर्वेक्षण करण्यात आले. यापैकी ३ लाख ७३ हजार १९१ घरांमध्ये वीज आहे. मात्र, ग्रामीण दुर्गम भागातील ५,९५१ घरांमध्ये अद्याप वीज नसल्याचे दिसून आले तर २५ घरांचा पुरवठा खंडित करण्यात आलेला आहे. 

स्वातंत्र्य मिळून ७१ वर्षे उलटून गेली तरी अजूनही जनता रस्ता, वीज यासारख्या सुविधांपासून वंचित असल्याचे या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. मात्र, आता ऊर्जा विभागाने मार्च २०१९पर्यंत सर्व घरांना वीज देण्याची घोषणा केल्याने आता या घरांमध्ये मार्चपूर्वी प्रकाश पसरेल, अशी आशा आता या निर्णयामुळे निर्माण झाली आहे.

वर्षानुवर्षे वीज नसल्याने अंधारात राहात असलेल्या जिल्ह्यतील या ५,९५१ घरांपैकी २,९७३ कुटुंबे दारिद्र्यरेषेखालील तर २,९५३ कुटुंबे दारिद्र्यरेषेवरील आहेत. तांत्रिक अडचणींमुळे जिल्ह्यातील पाच गावांमध्ये सर्वेक्षण झालेले 

नाही. या कुटुंबांना २०१९पर्यंत वीज मिळेल, अशी आशा आता निर्माण झाली आहे.

 

जिल्ह्यातील एकूण १,५३१ गावांपैकी १,५२६ गावांमधील ३ लाख ७९ हजार १४२ घरांमध्ये सर्वेक्षण करण्यात आले. यापैकी ३ लाख ७३ हजार १९१ घरांमध्ये वीज आहे. मात्र, ग्रामीण दुर्गम भागातील ५,९५१ घरांमध्ये अद्यापही वीज नसल्याचे दिसून आले. टपाल खात्याच्या सर्व्हेक्षणातील जिल्ह्याची ही आकडेवारी थक्क करणारी आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणPost Officeपोस्ट ऑफिसRatnagiriरत्नागिरी